१३
जीवन हे असंच जगायचं असतं।
दू:खाच्या काटयातून सावरत
सुखाच्या हिरवळीत
जायचं असतं।
१२
दिवासामागुनी दिवस जाती
प्रेमा तुझे रंग किती,
प्रेम व्यक्त करणेप्रती
शब्द्सुद्धा अपुरे पड़ती।
११
तू तिथे मी अन् मी तिथे तू
कुणाचीच कुणाला जाण नाही,
प्रेम तर मैत्रीतुनच होते
याचेही कुणाला भान नाही।
१०
तुझं ते मुकेपण
बरेच काही सांगून जातं ,
नजरेच्या इश्यार्याँनी
माझं मन हरपून जातं।
९
इथे प्रत्येकालाच
ठराविक जागा आहे,
‘तडजोड’ हा एक
जीवनाचा धागा आहे.
८
मी असाच आहे
एकटा एकटा राहणारा,
तू नाही भेटलीस
तरी तुझी वाट पाहणारा।
७
रात्र संपली की,
सूर्य उगवतो,
स्वप्न अर्धवट राहिले
म्हणुन मी उगाच रागवतो।
६
क्षणोक्षणी बदलणारी
जीवनाची वाट नवी आहे,
तू माझीच आहेस
फक्त तुझी साथ हवी आहे.
५
वाटसरुची वाट संपत नाही
म्हणुन तो चालायचे थांबत नाही,
जोपर्यंत त्याचा उद्देश पूर्ण होत नाही
तो पर्यंत त्यालाही राहवत नाही।
४
तुझ्याशी मैत्री केल्यावर
सौंदर्य पहायचं राहून गेलं ,
तुझ्या गोड स्वभावांनी
माझं ह्रदय वाहून नेलं।
३
प्रेमाचे भाष्य करताना
शब्दही अपुरे पडतात,
तुझ्या आठवणींनी मात्र
माझे शब्दही रडतात।
२
क्षणोक्षणी एकच आस
तुझे प्रेम मिळावे
हाच मनी ध्यास।
१
तू कुठेही जा
पण सुखी रहा ।
समोरून जाताना
एकदातरी मागे फिरुन पहा।
Thursday, February 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment