६५.
जीवन हा एक खेळ आहे
जुन्या- नव्या संस्कृतीचा
हाच खरा मेळ आहे.
६४.
वाईटांमधला वाईट गुण
बरेच काही शिकवून जातो,
शिकणारा चलाख असेल
तर त्यातही चांगले शिकून जातो.
६३.
इतरांचे वाईट करण्याने
त्यांचे वाईट होत नाही,
स्वत:ला कितीही चांगले वाटले
तरी मग त्याचे चांगलेही होत नाही.
६२.
नाविन्याची लहर
थोड़े दिवस वाटते,
तिचाही कहर झाला की,
ती सुद्धा मनात दाटते.
६१.
सर्वच सूखे
सर्वासाठीच नसतात
पण माणसे विचित्र
ती सर्वच मिळवित बसतात.
६०.
वेळ कुणावरही
सदैव मेहरबान नसते,
कारण वेळेलाही वेळोवेळी
वेळेचे भान असते.
५९.
तुमच्या क्षणिक सुखासाठी
इतरांना दू:ख भोगावं लागतं,
इतरांना दू:ख होवू नये
त्यासाठी स्वत: नीट वागावं लागतं.
५८.
सुर्याचा एक किरण
सर्व अंधार घालवतो,
सुखाच्या एका क्षणासाठी
आपण आयुष्य दू:खात घालवतो.
५७.
हे जग असंच आहे
चांगल्यालाही वाईट म्हणणारं,
वाईटाला खतपाणी देऊन
चांगल्यालाच सुकवणारं .
Wednesday, May 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment