मुंबई म्हणजे धावते जगच. या धावत्या जगात जीवनातला जास्तीत जास्त वेळ मुंबईकर हा घराबाहेर प्रवासात असतो. अशाच लोकलच्या प्रवासामध्ये अनेकजण अनेक संकल्पना उरांशी बाळगुन असतात आणि त्या सत्यात आणण्याचा प्रयत्नही करतात याच प्रवासामध्ये मीही तुमच्या सोबतीने रोज ये-जा करतो आहे, त्यातूनच मला हा कवी-संकल्पनेचा सुर गवसला आणि मी लिहू लागलो माझे बरेचसे काव्य, लिखाण हे लोकलमधीलच आहे. जगण्याची ही नवी रीत मला नव्याने अनुभवायला मिळाली आणि मग वेगवेगळ्या विषयांवर मी लिहायला लागलो त्यामध्ये कधी जीवन, प्रेम, कधी "ती" तर कधी "मी" वर चार ओळी लिहित गेलो. या चारोळ्या तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जातील, आणि तुमच्या भावनांना वेगळी दिशा देईल अशी आशा आहे ।
आपला
सुनिल जगदाळे
Sunday, October 9, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment